कर्जतमध्ये फेरमतदान घ्या, अथवा मतदानाची वेळ वाढवा ; श्रीरंग बारणे यांची मागणी...
       श्रीरंग आप्पा बारणे यांची मागणी...


पनवेल वैभव वृत्तसेवा / दि. 13 मे : - 
मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जतमध्ये दुपार नंतफ5 जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही वेळ मतदान केंद्र बंद होते. त्यामुळे कर्जतमध्ये फेरमतदान घ्यावे. अन्यथा वेळ वाढवून देण्याची मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
 
निवेदनात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वादळी वारा व पाऊस पडल्यामुळे या भागातील विजेचे  खांब पडले. घरावरील पत्रे उडून गेले. यामुळे अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर लाईट नसल्या कारणाने दोन ते तीन तास अनेक नागरिक मतदान करु शकले नाहीत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थितीची चौकशी करुन त्या भागात फेर मतदान घेण्याची मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न ...
Image