मनीषा पाटील यांनी दिबांचा वारसा चालवावा - महेंद्रशेठ घरत...
मनीषा पाटील यांनी दिबांचा वारसा चालवावा - महेंद्रशेठ घरत...

 पनवेल / ता, १३ ः दिबांचे राजकारण हे  सर्वसान्यांसाठी आणि निःस्वार्थी होते, अखेरच्या श्वासापर्यंत ते शेतकऱ्यांसाठी लढले. दिबांची सेवा मनीषा पाटील आणि अतुल पाटील यांनी मनोभावे केली. त्यामुळे मनीषा पाटील यांनी राजकारणात येऊन दिबांचा निःस्वार्थीपणाचा वारसा पुढे चालवावा, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केले. दिबांची आज ९९ जयंती, त्यानिमित्त पनवेल येथील दिबांच्या संग्राम बंगल्यात महेंद्रशेठ घरत यांनी दिबांच्या प्रतिमेला नमन करून आदरांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते.  
राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण आहे, त्यामुळे मनीषा पाटील यांनी त्याचा विचार करून दिबांचा वारसा चालवण्यासाठी राजकारणात यावे, कारण दिबांची सून म्हणून मनीषा पाटील यांनी दिबांना दिलेली साथ, त्यांची केलेली सेवा आमच्या कायम स्मरणात आहे. त्यामुळे आम्ही शक्य ते सहकार्य करण्यास तयार आहोत, असेही महेंद्रशेठ घरत यावेळी म्हणाले.
यावेळी दिबांचा परिवार उपस्थित होता.
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image