संसदेत जामर असताना जिओ कंपनीलाच फक्त नेटवर्क कसे? खासदार श्रीरंग बारणे यांचा लोकसभेत सवाल...


पनवेल  / २३ मार्च - संसदेत जामर असताना जिओ कंपनीलाच फक्त नेटवर्क कसेजिओ कंपनीला संसदेत विशेष सूट का देण्यात आली. जिओचा मोबाईल नेटवर्क जामरच्या बाहेर आहे का,  केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान का आहेअसे सवाल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केला.

खासदार बारणे म्हणालेसंसदेचे कामकाज सुरू असताना कोणाचेही फोन लागू नयेत यासाठी जामर लावले जाते. भारत सरकारची बीएसएनएल आणि एमटीएल कंपनी आहे. या कंपनीला देखील जामर आहेत. देशभरात या कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित चालत देखील नाही.

लोकसभेत बीएसएनएलएमटीएलचे नेटवर्क चलत नसताना फक्त  जिओचे नेटवर्क येत आहे. या कंपनीला जामरच्या बाहेर ठेवले आहे काहे योग्य नाही. जिओ कंपनीला  सपोर्ट केले जात आहे. त्यांच्यावर मेहरबानी का दाखविली जात आहे. जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट का देण्यात आली. जिओचा मोबाईल नेटवर्क जामरच्या बाहेर का आहे,  केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान का आहेअसे विविध सवाल खासदार बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केले. त्यावर पीठासीनावर विराजमान असलेल्या रमादेवी यांनी याबाबत अध्यक्ष ओम बिर्ला निर्णय घेतीलअसे सांगितले.





Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image