लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता भंग कारवाई भरारी पथक..
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता भंग कारवाई भरारी पथक..


पनवेल दि.२०(संजय कदम): आगामी लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या नियम व अटींचा भंग करणाऱ्या व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष यांच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याच्या उद्देशाने आचार संहिता भंग कारवाई भरारी पथकाची नेमणूक पनवेल तालुक्यात करण्यात आली आहे. 
             पनवेल तालुक्यात अश्या प्रकारची ६ भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून त्यामध्ये शासकीय  अधिकारी, पोलीस कर्मचारी व १ कॅमेरामन यांच्या दिमतीला एक शासकीय गाडी सोबत राहणार आहे. या संदर्भात तक्रार किंवा माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाने एक अँप घोषित केले असून या अँप वर तक्रार दाखल करताच हे भरारी पथक त्वरित त्या ठिकाणी जाऊन संबंधित माहितीची शहानिशा करून कारवाई करणार आहे. ती पथके सकाळी व तीन पथके रात्री अशी २४ तास ही पथके उपलब्ध राहणार आहेत. व ते आचार संहिता भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार आहेत.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image