भाजप कामगार मोर्चाच्या माध्यमातून नवी मुंबई, पालघर, कोकण विभागात मोदींजींच्या 'मन की बात' चे आयोजन..
 मोदींजींच्या 'मन की बात' चे आयोजन..


पनवेल दि.३१ (संजय कदम) : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. भाजप कामगार मोर्चा च्या माध्यमातून सदर कार्यक्रम सामान्य जनतेच्या पर्यन्त पोहोचवण्यासाठी नवी मुंबई, पालघर, कोकण विभागात कामगारांसाठी 'मन की बात' कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.
               नवे विचार आणि नवी ऊर्जा देणारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. सदर कार्यक्रम सामान्य जनतेच्या पर्यन्त पोचवण्याचे कार्य भाजप कामगार मोर्चा च्या माध्यमातून भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कामगार मोर्चाचे  प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे यांचा सूचनेनुसार केले गेले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम कामगार मोर्चा च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मोठ्या ताकदीने राबवला. नवी मुंबई, पालघर व दापोली या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष संजय वासुदेव पवार आणि कोकण अध्यक्ष कमलेश राणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अशोक आंबूरे, कोकण सचिव स्वरूप महाजन, समाजसेवक अशोक नरबागे यांच्या कडून कामगारांसाठी 'मन की बात' कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.





फोटो : भाजप कामगार मोर्चाच्या माध्यमातून मन की बात चे आयोजन
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image