तलावातील गाळ काढण्यास परवानगी मिळण्याकरिता पालिकेच्या वतीने याचिका दाखल ..
 पालिकेच्या वतीने याचिका दाखल ...


पनवेल दि.१० (वार्ताहर) : पनवेल कळंबोली वसाहतीमधील गाळाने भरलेल्या धारण तलावांमुळे वसाहतींना पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. यामुळे गाळ काढण्यास परवानगी मिळावी या करीत पनवेल पालिकेच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. धारण तलावात ८० टक्के गाळ असल्याने केवळ २० टक्केच पाणी साचू शकते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही.
समुद्र सपाटीपासून खाली असलेल्या कळंबोली वसाहतीत सिडकोतर्फे होल्डिंग पॉन्डची निर्मिती करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यापासून वसाहतींचे संरक्षण व्हावे या हेतूने सिडकोने बांधलेले हे धारण तलाव सध्या गाळाने व खारफुटीने भरलेले आहेत. गाळ आणि खारफुटीने भरल्यामुळे या ठिकाणी नेहमीच उग्र वास येत असतो. ८० टक्के गाळ साचल्याने दरवर्षी पावसाळयात कळंबोली शहरात पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या धारण तलावांची स्वच्छता व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र धारण तलावात वाढलेल्या कांदळवाणामुळे गाळ काढतांना कांदळवनांना धोका पोहचण्याची शक्यता असल्याने धारण तलावाची. स्वच्छता करण्यासाठी कांदळवन कक्षाच्या मान्यतेची गरज लागत आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image