तलावातील गाळ काढण्यास परवानगी मिळण्याकरिता पालिकेच्या वतीने याचिका दाखल ..
 पालिकेच्या वतीने याचिका दाखल ...


पनवेल दि.१० (वार्ताहर) : पनवेल कळंबोली वसाहतीमधील गाळाने भरलेल्या धारण तलावांमुळे वसाहतींना पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. यामुळे गाळ काढण्यास परवानगी मिळावी या करीत पनवेल पालिकेच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. धारण तलावात ८० टक्के गाळ असल्याने केवळ २० टक्केच पाणी साचू शकते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही.
समुद्र सपाटीपासून खाली असलेल्या कळंबोली वसाहतीत सिडकोतर्फे होल्डिंग पॉन्डची निर्मिती करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यापासून वसाहतींचे संरक्षण व्हावे या हेतूने सिडकोने बांधलेले हे धारण तलाव सध्या गाळाने व खारफुटीने भरलेले आहेत. गाळ आणि खारफुटीने भरल्यामुळे या ठिकाणी नेहमीच उग्र वास येत असतो. ८० टक्के गाळ साचल्याने दरवर्षी पावसाळयात कळंबोली शहरात पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या धारण तलावांची स्वच्छता व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र धारण तलावात वाढलेल्या कांदळवाणामुळे गाळ काढतांना कांदळवनांना धोका पोहचण्याची शक्यता असल्याने धारण तलावाची. स्वच्छता करण्यासाठी कांदळवन कक्षाच्या मान्यतेची गरज लागत आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image